Maharashtra मुख्यमंत्रिपदासाठी विठ्ठलाला साकडं, राजकीय चर्चा; विठ्ठल कुणाला पावणार? Special Report

Continues below advertisement
पंढरपुरात कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाकडून मुख्यमंत्रिपदासाठी विठ्ठलाला साकडे घालण्यात आले आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. 'आषाढीची पूजा करायला आवडेल ना? कोणाला पण आवडेल? मला काय, सर्व जनतेला आवडेल', असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे (Lata Shinde) यांनी आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली. आषाढी एकादशीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते, त्यामुळे शिंदेंना मुख्यमंत्रीपदी पाहण्याची ही सुप्त इच्छा असल्याचे मानले जाते. दुसरीकडे, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी 'पुढच्या निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार व्हावेत', असे थेट साकडे विठ्ठलाला घातले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाच्या लाचारीवरून शिंदेंवर केलेल्या टीकेचीही आठवण काढली जात आहे. आता दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून आलेल्या या मागणीवर विठुराया कोणाला कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola