Maharashtra Civic Polls: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ
Continues below advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या मर्यादेत दीडपट वाढ करून मोठा दिलासा दिला आहे, तर दुसरीकडे मतदार यादीतील गोंधळावर कारवाई सुरू केली आहे. राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता असावी यासाठी मतदार याद्यांमधल्या संभाव्य दुबार नावांची तपासणी करून योग्य ती दक्षता घेतली जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडी आणि मनसेने केलेल्या तक्रारींनंतर, संभाव्य दुबार नावांची स्थानिक पातळीवर तपासणी करून ती एकाच व्यक्तीची आहेत की नाहीत, हे निश्चित केले जाणार आहे. यापूर्वी जिल्हा परिषदांसाठी सहा लाख आणि महापालिकांसाठी दहा लाखांची खर्च मर्यादा होती. आता महापालिका निवडणुकीसाठी सदस्य संख्येऐवजी शहराच्या वर्गवारीनुसार नवी खर्च मर्यादा ठरणार असल्याने उमेदवारांना अधिक खर्च करता येणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement