Maharashtra Border Disputes : सीमावर्ती गावातील प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावल महत्त्वाची बैठक

Continues below advertisement

दरम्यान सीमावर्ती भागातील गावांच्या प्रश्नावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.. गावातील पाणी प्रश्न आणि ग्रामस्थांच्या इतर मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे..  तर संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या बैठकीसाठी  मुख्यमंत्र्यांसोबत सीमावर्ती जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री, खासदार, जतचे आमदार , जिल्हाधिकारी, अन्य लोकप्रतिनिधींना बोलावण्यात आलंय. म्हैसाळ विस्तारित योजना पूर्ण करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याच्या दृष्टीने सरकारी गोटातील हालचाली वाढल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram