Maharashtra Bhushan Sohla : महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेवर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटना सरकार निर्मित आपत्ती आहे... आणि या दुर्घटनेला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलाय... अजित पवारांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून ढिसाळ नियोजनामुळेच श्रीसेवकांचा मृत्यू झाल्य़ाचा आरोप केलाय... आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय...