Farm Laws Repeal: 'देर आए दुरुस्त आए' दिलीप वळसे पाटील यांची कृषी कायद्यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
19 Nov 2021 03:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppFarmers Protest : तिनही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. दिल्लीतील वेगवेगळ्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच मोदींच्या निर्णयानंतर अनेक मीम्सही नेटकऱ्यांकडून शेअर केले जात आहेत. केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय आगामी पंजाब आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचंही बोललं जात आहे. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.