Uday Samant म्हणतात कोकणात येणाऱ्यांना RTPCR Testची गरज नाही तर RTPCRसक्तीची जिल्हधिकाऱ्यांची माहिती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली जात आहे. दरम्यान गणेशोत्सवाला सुरूवात होणार असून सरकार, आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. कोकणातील गणेशोत्सवामध्ये होणारी गर्दी, चाकरमान्यांचं आगमन या साऱ्या पार्श्वभूमीवर आता रत्नागिरी जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली गेली आहे. या नियमावलीनुसार दोन डोस पूर्ण न झालेल्या व्यक्तिला आता आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा प्रवेश करताना किमान 72 तासापूर्वीचे रिपोर्ट दाखवणे आता बंधनकारक आहे. तसेच रिपोर्ट नसल्यास जिल्हा प्रवेशापूर्वी सदर व्यक्तिची चाचणी केली जाईल. यावेळी चाचणी पॉझिटीव्ह आल्यास सदर व्यक्तिला संस्थात्मक विलगीकरणात पाठवले जाईल. पण, दोन डोस पूर्ण झालेल्या व्यक्तिला मात्र यामधून सुट मिळाली आहे. त्यामुळे दोन डोस पूर्ण झालेल्या असल्यास जिल्ह्यात कोणत्याही चाचणीविना प्रवेश मिळणार आहे.
पण काल कोकणात येणाऱ्यांना RTPCR बंधनकारक नाही अशी माहिती उदय सामंत यांनी दिली हाती. तर चाकरमान्यांनी गावांना सहकार्य करावं असं आवाहन उदय सामंत यांनी कोकणवासीयांना केल आहे. पण RTPCR टेस्ट सक्तीची असल्याची माहिती आज जिल्हधिकाऱ्यांची दिली आहे. तर कोकणवासीयांमध्ये RTPCR टेस्ट संबंधी मोठा संभ्रम आहे.