Kolhapur NCP Banner : 'सुजल्यावर कळतं...पवारांनी मारलं कुठे', कोल्हापुरात शरद पवार गटाची बॅनरबाजी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) राज्यात महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) दमदार यश मिळवताना तब्बल 30 जागा जिंकल्या आहेत. सांगलीमधील अपक्ष विशाल पाटील यांनी सुद्धा विजय खेचून आणत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या 31 वर पोहोचली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणुकीत दहा जागांपैकी तब्बल आठ जागा जिंकल्याने शरद पवारांचे राज्याच्या राजकारणातील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आह. पक्ष फोडून बाजूला गेलेल्या अजित पवार यांना सुद्धा तगडा झटका दिला आहे.
सुजल्यावर कळतं, शरद पवारांनी मारलंय कुठं
नेमका आता हाच धागा पकडत कोल्हापूरमध्ये लागलेल्या बॅनर्सची सुद्धा चांगली चर्चा रंगली आहे. कोल्हापुरातील स्टँड परिसरामध्ये एक बॅनर लावण्यात आला आहे. त्या बॅनरवर सुजल्यावर कळतं, शरद पवारांनी मारलंय कुठं असा उपरोधिक उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे हा बॅनर कोल्हापूरमधील चांगलाच चर्चेला विषय झाला आहे. स्टँड परिसरातील लावलेला हा बॅनर युवा कार्यकर्ते कल्पेश चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी फोडल्यानंतर कोल्हापुरातील ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती असल्याने हे नेते महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठिशी होते. मात्र, संजय मंडलिक यांचा दारुण पराभव झाला. इतकेच नव्हे तर कागल मतदारसंघ हा मुश्रीफ आणि मंडलिक यांचा बालेकिल्ला असूनही अपेक्षित मताधिक्य घेता आलं नाही.