Kolhapur : काळमावाडी जलाशयाला गळती, लगतच्या गावांना मोठा धोका
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातील काळमवाडी इथल्या दुधगंगा धरणाच्या मुख्य भिंतीला गळती लागली असून मुख्य भिंतीतून प्रतिसेकंद 300 लिटर पाण्याची गळती होत असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे. मात्र गळतीचं प्रमाण पाहता लाखो लिटर पाण्याची गळती होत असल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दावा केला आहे. 'मेघोली धरण फुटीसारखी दुर्घटना घडण्याआधी मुख्य भिंतीची दुरुस्ती करा अन्यथा धरण दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन उभारू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे.
Continues below advertisement