Kalyan Clash: कल्याणमध्ये किरकोळ कारणावरून राडा, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report
Continues below advertisement
कल्याणमधील (Kalyan) मोहने आणि लहुजीनगरमध्ये दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीने कायदा आणि सुव्यवस्थेवर (Law and Order) प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'पोलिसांच्या डोळ्यात हा सगळा प्रकार सुरू होता', या वृत्तामुळे वर्दीच्या भूमिकेवर तीव्र शंका उपस्थित होत आहे. फटाक्यांच्या स्टॉलवरील किरकोळ वादाचे पर्यावसान मध्यरात्री झालेल्या दगडफेक, जाळपोळ आणि महिलांना झालेल्या मारहाणीत झाले. या घटनेत अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी दोन्ही गटांतील काही तरुणांना ताब्यात घेऊन परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असले तरी, पीडितांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांच्या समोरच हा भयानक हल्ला सुरू होता आणि त्यांनी वेळीच हस्तक्षेप केला नाही. या प्रकारामुळे गावगुंडांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement