Jitendra Awhad: आव्हाडांचे शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप ABP Majha

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना यांच्यामधला सुप्त संघर्ष ठाणे शहरासाठी काही नवा नाही. पण ठाणे महापालिकेची आगामी निवडणूक आणि वॉर्डरचनेवरुन जितेंद्र आव्हाडांनी शिवसेना नेते आणि ठाण्याच्या आयुक्तांवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. वॉर्डरचना करताना मुस्लीम द्वेष दिसतो असा गंभीर आरोप आव्हाडांनी ठाण्यातील शिवसेना नेत्यांवर केला. देवेंद्र फडणवीसांच्या काळातही एवढा त्रास झाला नव्हता असंही आव्हाडांनी म्हटलं आहे. त्यामुळं राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष ठाण्यात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola