Jitendra Awhad : आधी उद्योग नेले, आता सरकारी कार्यालयं देखील नेतायत : आव्हाड
मुंबईतील वस्त्रोद्योेग आयुक्तालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. वस्त्रोद्योग विभागातील अवर सचिव जयश्री श्रीकुमार यांनी तसं पत्र वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी यांना लिहिलं आहे. विरोधकांनी मात्र या निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे. अन्य उद्योगांप्रमाणं आता वस्त्रोद्योग आयुक्तालयही मुंबईपासून हिरावून नेलं अशी भूमिका विरोेधकांनी घेतली आहे.