निवडणुकांचा निर्णय हायकमांड घेईल,नाना पटोलेंच्या निवडणुकींबाबतच्या वक्तव्याचं एच के पाटलांकडून खंडन
महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला एक वर्ष आणि सात महिने झाले त्याच्या आतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याची चर्चांना उधाण आले होते. मात्र महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी एच के पाटील यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट करत चर्चांना पूर्णविराम लावला आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.