Lockdown | मजुरांच्या स्थलांतरचा फटका, अतिरिक्त पैसे देऊनही मजूर मिळेना; गुऱ्हाळ व्यवसाय अडचणीत
हिंगोलीत सध्या गुराळ कारखान्यावर शेतातील उसापासून गूळ बनविण्याचे काम सुरू आहे. मात्र सध्या मजुरांचे स्थलांतर वाढल्याने गुराळ व्यवसाय हा अडचणीत सापडला आहे. ज्या ठिकाणी 20 ते 25 कामगाराची गरज असते. त्याठिकाणी मात्र चार ते पाच मुजरा वरच काम भागविण्याची वेळ आली आहे. अतिरिक्त पैसे देऊन सुद्धा मजूर मिळत नाहीयेत. त्यामुळे कामाचा भार हा शेतकऱ्यांवर येऊन पडला आहे.