Governor VS Mahavikas Aghadi : सरकारचा राज्यपालांना अल्टिमेटम, मुदत संपली तरी राज्यपालांचं उत्तर नाही

Continues below advertisement

राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातला तणाव आता चांगलाच वाढलाय. '६ वाजेपर्यंत मंजुरी द्या, अन्यथा विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला पाठिंबा असल्याचं गृहित धरू असं खरमरीत पत्र ठाकरे सरकारनं राज्यपालांना पाठवलंय. राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना राज्य सरकारनं हे अल्टिमेटम राज्यपालांना दिलंय. ठाकरे सरकारच्या इशाऱ्यानं राज्यपाल कार्यालय संतप्त झालंय. संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची मुदत संपून तासभर झालाय. पण अजून राज्यपालांचे उत्तर मात्र आले नाही, तर विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक उद्याच घेण्यावर महाविकास आघाडी ठाम आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram