Diwali Blackout: 'एक रुपयाची सुद्धा मदत नाही', Darphal मधील पूरग्रस्तांचा आक्रोश
Continues below advertisement
तिन्हा नदीला (Tinha River) आलेल्या महापुराचा फटका बसलेल्या दारफळ (Darphal) आणि सुलतानपूर (Sultanpur) गावातील पूरग्रस्त दिवाळीच्या दिवशीही शासनाच्या मदतीविना आहेत. 'एक महिना उलटून गेला तरीही शासनाची मदत अजूनही मला स्वतःला किंवा माझ्या वडिलांना आलेली नाहीये एक रुपयाची सुद्धा,' अशी व्यथा अंकित नावाच्या पूरग्रस्त तरुणाने मांडली. सप्टेंबर महिन्यात आलेल्या या पुरामुळे अनेकांची घरं आणि संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. अनेक कुटुंबांना तीन दिवस पुराचं पाणी पिऊन काढावे लागले. शासनाने मदतीचे आश्वासन दिले असले तरी, महिना उलटूनही मदत न मिळाल्याने अनेकांची दिवाळी अंधारात गेली आहे. लहान मुलांना नवीन कपडे किंवा फटाके घेता आले नाहीत आणि अनेक घरांमध्ये दिवाळीचा सण साजराच झाला नाही, असं गावकऱ्यांनी सांगितलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement