Mahayuti Politics: 'आम्ही एकला चलो रे', भरत गोगावलेंचा Sunil Tatkare यांना नाव न घेता इशारा
Continues below advertisement
रायगड (Raigad) जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून महायुतीमधील (Mahayuti) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे नाव न घेता थेट इशारा दिला आहे. 'समान जागावाटपाचा महायुतीतील फॉर्म्युला ठरला असताना जर का कोणी दोन पावलं मागे येत नसेल तर एकला चलोरेच्या भूमिकेत आम्ही राहू,' असा सज्जड दम भरत गोगावले यांनी दिला आहे. जागावाटपाचा तिढा न सुटल्यास कोणाच्याही मागे लागणार नाही, असेही ते म्हणाले. महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर प्रत्येकाने आपली पावले मागे घेणे गरजेचे आहे, अन्यथा आम्ही एकला चलो रे'च्या भूमिकेत राहू, असे गोगावले यांनी स्पष्ट केले, ज्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement