Farmers Rain Loss : सांगलीत अवकाळी पावसाचा तडाखा, वादळी वाऱ्यानं द्राक्षबागा भुईसपाट

Continues below advertisement

Maharashtra Unseasonal Rainfall : महाराष्ट्रामध्ये निसर्गाच्या लहरीपणा भर उन्हाळ्यामध्येही सुरुच आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात मोठी वाढ झाली होती. अनेक जिल्ह्याचा पारा 40 च्या पार गेला होता. कडाक्याच्या उन्हामुळे राज्य होरपळून निघाले होते. काही ठिकाणी पिकेही करपली होती. या उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या शेतकऱ्याला आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागतोय. कडाक्याच्या ऊन असतानाच अचानक अवकाळी पाऊस पडला, यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक आणि तळकोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. काही ठिकाणी तर गारपीठही झाली. यामुळे द्राक्षे आणि अंब्यासह इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram