Explainer | शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याचा साधा फंडा | ABP Majha
देशातल्या उद्योगपतींकडं दहा लाख कोटींची कर्जे थकली आहेत. थकीत पैसा वसूल व्हावा यासाठी दिवाळखोरी कायद्यात 2016 साली बदल करण्यात आले. नव्या बदलानंतर 23 खातेदारांच्या प्रकरणांची प्रक्रिया पुर्ण झाली. बँकांना या खातेदारांकडून 1 लाख 37 हजार 745 कोटी रुपये येणे होते. प्रत्यक्षात 63 हजार 982 कोटीचं मिळाले. 51 टक्के रक्कम बुडाली. उध्दव ठाकरेंनी शेतकरी कर्जमाफी देताना हा कायदा आणि बँकाची एक रक्कमी कर्जमाफीच्या योजनेचा अभ्यास केला तर अवघ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी सातबारा कोरा करण शक्य आहे.