Ramdas Athawale | माझाच्या बातमीची दखल; कोल्हापुरातील दिव्यांगांना अखेर साहित्यवाटप | ABP Majha
केंद्रीय मंत्र्यांना वेळ नसल्याने गेली वर्षभर कोल्हापुरातील दिव्यांगांना वाटण्यात येणारं साहित्य धूळखात पडलं होतं. याबाबतचं वृत्त एबीपी माझानं दाखवल्यानंतर केंद्र सरकारला त्याची दखल घ्यावी लागलीय. केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप झालं....जिल्ह्यातल्या 15 हजार दिव्यांगांना 10 कोटींचे आणि 42 प्रकारचे वेगवेगळे साहित्य पडून होतं..जिल्हापरिषदेनं याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार केला. पण मंत्र्यांना उदघाटनासाठी वेळ नसल्याचे कारण देण्यात येत होतं...