Maharashtra : राज्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भाव वाढला, रुग्णसंख्या 7 हजारांवर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Aug 2021 10:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात डेंग्यु, मलेरिया आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढलाय आणि आतापर्यंत ७ हजारावर रुग्ण आढळले आहेत, तर डेंग्युमुळे ११ जणांचा मृत्यू झालाय. डेंग्युमुळे सर्वाधिक सहा मृत्यू नागपूरमध्ये झालेत. मुंबईतही डेंग्युचे रुग्ण वाढत आहेत. राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे लेप्टोच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांच्या रुग्णांची संख्याही यावर्षी काही प्रमाणात वाढली आहे.