SSC Exam : विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : सीबीएसईतर्फे बारावीच्या परीक्षेसंदर्भातील आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या बैठकीत सहभा घेतला होता. विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता असेल आणि तिच प्राथमिकता लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून परीक्षांसंदर्भातील निर्णय लवकरच घेऊ, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. 

विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय घेऊ असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.  दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी दोन दिवसांत बैठक घेणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola