
Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर...
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणावर देखील भाष्य केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत प्रोफेशनली तपास केला. आपण जर बघितलं तर या संपूर्ण चर्चेमध्ये धनंजय मुंडे यांचा कुठेही थेट संबंध आलेला नाही तरीही आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला, याचा एकमेव कारण असा आहे की, या संपूर्ण प्रकरणांमध्ये ज्याला मुख्य आरोपी केलेला आहे तो वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा राईट हॅन्ड आहे. वर्षानुवर्ष धनंजय मुंडे यांचे राजकारण त्यांनी सांभाळलेला आहे आणि म्हणून सहाजिक महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा होती की अशा प्रकारे जर नेत्यांच्या जवळचे लोक इतका क्रूर अशा प्रकारचा काम करत असतील तर नेत्यांनी काही ना काही तरी पश्चाताप म्हणून किंवा ज्याला आपण असं म्हणू शकतो. नैतिकतेच्या आधारावर अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे नंतर किंवा चर्चेत गेल्यानंतर दोन गोष्टी क्लियर झाल्या. एक चर्चेतमध्ये धनंजय मुंडेंचं नाव नाही आणि दोन वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. धनंजय मुंडे यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर आमची चौकशीची आणि कारवाईची तयारी आहे, पण उगीच हवेत तीर मारण्यात अर्थ नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पोलीस पुर्णवेळ हजर होते, नव्हते हे खोटं आहे. नागपुरात छोट्या-छोट्या गल्ल्या आहेत, तिथे पोलीस पोहोचले नाही हा प्रॉब्लेम होता. आंदोलकांची संख्या जास्त होतं तसं नाही. हे लोक त्यांच्या समाजाला बदनाम करतायत. पोलिसांचा रिस्पॉन्स योग्यच होतं. त्यांनी कसा मुकाबला केला, त्याचे सीसीटीव्ही आहेत. हिंसा नागपुरातच का झाली याची उत्तर मी शोधतोय. मी एक शंका व्यक्त केली. अधिकारीक बोलत नाही. या गोष्टी ठरवून झाल्या का?, हे पहावं लागेल. या आधीच्या घटनांमध्ये एक पॅटर्न होता, तो इथे होता का?...सोशल मिडीयावर बांग्लादेशच्या बंगालीच्या पोस्ट दिसतायत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.