ABP News

CRPF in State : राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये दंगल नियंत्रण पथकाचं पथसंचलन, नेमकं कारण काय?

Continues below advertisement

CRPF in State : राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये दंगल नियंत्रण पथकाचं पथसंचलन, नेमकं कारण काय?


राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील २२ जिल्ह्यांत केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात CRPF च्या विशेष दंगल नियंत्रण पथक, 102 बटालियन रॅपिड अॅक्शन फोर्सकडून पथसंचलन केलं जातंय. गुप्तवार्ता विभागाच्या अहवालावरून कायदा आणि सुव्यवस्थेसंबंधी अनुचित प्रकार टाळण्यासाठी हे पथसंचलन केलं जातंय. यात धुळे, अमरावती, अकोला, मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, आदी 22 संवेदनशील जिल्ह्यांचा समावेश आहे. याच हेतूने जालना जिल्ह्यात सीआरपीएफची एक बटालियन पुढील 8 दिवस जिल्ह्यातील विविध तालुक्यात पथसंचलन करणार आहे.


 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram