Corona Third Wave : राज्यातील 70% रुग्ण फक्त 'या' 5 जिल्ह्यांमध्ये, आरोग्य खात्याचा अलर्ट
महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. नव्हे नव्हे, कोरोनाने जोरदार धडक द्यायला सुरुवात केलीय. आपल्या देशातच केरळ राज्यात रोज 30 हजार नवे रुग्ण समोर येत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे आणि तो आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतला नाही, तर महाराष्ट्राला जनजीवनाची फार मोठी किंमत चुकवावी लागेल.गणेशोत्सव काळात पुन्हा कडक निर्बंध लागणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रसह देश तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. राज्यातील 70% रुग्ण फक्त 5 जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत तरी कोरोना नियमांंचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाने केल आहे.