महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये 15 दिवसात रुग्णसंख्येत घट, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची दिलासादायक माहिती!
Continues below advertisement
राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णसंख्येच काहीशी घट झाली आहे. राज्यात आज 48 हजार 621 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर 59, 500 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. सध्या राज्यात 6 लाख 56 हजार 870 रुग्णांना उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 70 हजार 851 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement