महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा आढावा घ्या, काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : निधी वाटपाच्या बाबतीत काँग्रेसचे जे आक्षेप आहेत ते मिटवावे आणि राज्यातील सरकारच्या किमान समान कार्यक्रमाच्या बाबतीत आढावा घ्यावा या मागणीसाठी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी ही भेट घेतली.