Satyacha Morcha: 'मविआ मोर्चात काँग्रेसची दुटप्पी भूमिका?
Continues below advertisement
मुंबईत आज महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) यांनी मिळून 'सत्याचा मोर्चा' काढला. या मोर्चात राज ठाकरे (Raj Thackeray), उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे प्रमुख नेते एकाच मंचावर दिसले. मात्र, 'सत्तेच्या मोर्चामध्ये काँग्रेसने दोन्ही दगडांवर पाय ठेवले का' अशी चर्चा सुरू झाली आहे, कारण काँग्रेसचे अनेक मोठे नेते या मोर्चात अनुपस्थित होते. एकीकडे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील मोर्चात सहभागी झाले होते, तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मोर्चाकडे पाठ फिरवली. राज ठाकरे यांच्याशी जवळीक केल्यास आगामी भिवंडी निवडणुकीत फटका बसू शकतो, अशी भीती काँग्रेसला वाटत असल्यानेच ही दुटप्पी भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement