Nagar Panchayat Elections : स्बबळाचा अट्टाहास कॉग्रेसला नडला? फक्त 18 नगरपंचायतींमध्ये पक्षाची सत्ता
abp majha web team
Updated at:
20 Jan 2022 08:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा विचार केला तर सर्वात जास्त जागा ह्या राष्ट्रवादीच्या परड्यात आहे. त्या खालोखाल शिवसेना आणि मग काँग्रेसचा नंबर आहे त्यामुळे आता तरी कॉंग्रेसने आत्ममग्न होऊन स्वबळाचा हट्ट सोडावा अशी मागणी शिवसेनेच्या दोन जेष्ठ नेत्यांनी केली आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढल्यामुळे अनेक ठिकाणी आमच्या जागा पडण्यास मदत झाली अशी थेट टीका दिपक केसरकर यांनी केली आहे. त्यामुळे आज कॅबिनेट पूर्वी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊ शकते.