Collage Reopen : रत्नागिरीत आजपासून महाविद्यालयं सुरु, कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकारक
अमोल मोरे, एबीपी माझा
Updated at:
20 Oct 2021 11:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आजपासून 56 महिविद्यालयं दीड वर्षानंतर सुरू झाली आहेत. जिल्ह्याचा विचार करता जवळपास 21 हजार विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये हजर राहणार आहेत. आजपासून कॉलेज सुरू होणार असल्यानं विद्यार्थ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. प्रत्यक्ष कॉलेजमध्ये हजर राहून शिकणे आणि ऑनलाईन शिक्षण यामध्ये बराच मोठा फरक असतो. कॉलेज सुरू होत असल्यानं आनंद होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी दिली आहे. कोरोना काळातील सर्व नियम यावेळी पाळले जाणार असून मुंबई विद्यापीठाचे नियम रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयांना लागू असणार आहेत.