Uddhav Thackeray | गॅस पेटवणं सोपं, पण चूलही पेटली पाहिजे : उद्धव ठाकरे | ABP Majha
गॅस पेटवणं एका राजकारण्यासाठी सोपं आहे परंतु चूलही पेटली पाहिजे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता गॅस जोडणी प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन मोदींना टोला लगावला आहे. शेतकरी हा एक पाऊल पुढे टाकून मेहनत करत असतो. आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही कर्जमुक्तीसोबतच शेतकऱ्यांना चिंतामुक्तही करणार आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले. आपण करत असलेले प्रयोग कधी यशस्वी होतात, तर कधी फसतात. त्यामुळे आपण प्रयोग करणं सोडायचं नाही.