Chandrashekhar Bawankule : विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी भाजपमध्ये 18 जण इच्छुक
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChandrashekhar Bawankule : विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी भाजपमध्ये 18 जण इच्छुक विधानसभेसाठी काय रणनीती असेल? मविआने जो खोटारडेपणा केला, जनतेला फसवलं. आदिवासी जनतेला फसवलं, महिलांना फसवलं.. अशा अनेक विषयातून महाविकास आघाडीने मत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी वचन दिल्यानुसार काम करतील. त्यामुळे जनता नक्की या खोटारडेपणातून बाहेर निघेल. केंद्रातील आणि राज्यातील सरकारी का विचाराचा असेल तर राज्यातील जनतेला फायदा होतो. केंद्रातील सरकार आताचे काम करणार आहे त्या सरकारचा पूर्णपणे उपयोग हा महाराष्ट्रातल्या जनतेला होईल. महाविकास सकाळी सरकार येणार म्हणजे केंद्रातली काम पूर्ण पणे बंद करणे. महाविकास आघाडी सरकार आल्यास जनतेचे नुकसान होईल. ते फक्त केंद्राच्या योजना थांबवण्याचे काम करते, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले नाहीत- प्रचाराला अनेक मुद्दे असणार आहेत. मात्र डबल इंजिन सरकार असेल तर जनतेचा फायदा असतो. जसं उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये झालं. नरेंद्र मोदी महाराष्ट्रासाठी अनेक योजना आणायला तयार होते. मात्र उद्धव ठाकरे कधीही मंत्रालयात आले नाहीत. कधीही मोदीजींशी चर्चा केली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झालं. आम्हाला नरेंद्र मोदी नको, आम्हाला मोदीजींच्या सरकार चालत नाही या भूमिकेतून ते काम करत होते. म्हणून जनतेचे नुकसान झालं. दोन्हीकडे एका विचाराचा सरकार असेल तर जनतेचा फायदा होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.