Farmers Agitation | चंद्रपुरात कापूस खरेदी आंदोलन पेटले, शेतकऱ्यांनी तेलंगणाला जाणारा महामार्ग रोखला
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत उग्र आंदोलन केले. पावसाळा तोंडावर असताना कोरोना संकटामुळे विक्री करु न शकलेला कापूस शेतकरी सध्या खरेदी केंद्रांवर आणत आहेत. मात्र सरकारच्या ढिसाळ नियोजनाने संतापात भर पडल्याने चंद्रपूर-आदिलाबाद महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरल्याने अडचणीची स्थिती उद्भवली होती. जिल्ह्यातील बाजार समिती आणि सीसीआय मार्फत सुरु असलेली खरेदी केंद्रे शेतकऱ्यांच्या रोषाचे कारण ठरले आहे