Chandrapur Rain | चंद्रपूरला वादळी पावसाचा तडाखा; भात शेतीसह भाजीपाल्याचं नुकसान
चंद्रपूर जिल्ह्याला गेल्या 15 दिवसात 3 वेळा वादळाचा आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना-राजुरा-चिमूर, मूल, ब्रह्मपुरी- नागभिड -सिंदेवाही या भागात गारपीटीसह मुसळधार पावसाने थैमान घातले. या सर्वांचा फटका या भागातील उन्हाळी भात शेतीला बसला आहे. हातातोंडाशी आलेले भात पीक या वादळी पाऊस आणि गारपिटीने जमीनदोस्त झाले आहे. सोबतच भाजीपाला पिकांचे देखील अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.