Chandrakant Patil | सरकारला धडकी भरेल असं भाजपचं आंदोलन होतं : चंद्रकांत पाटील

राज्यात 355 ठिकाणी अडीच लाखांहून अधिक लोक महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले होते. हिंगणघाट, मुंबई, पुणेसह छोट्या गावांमध्येही लोकांनी आंदोलन केली, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांचे भले करण्यासाठी हे सरकार आलेले नसून हे फसवणूक करणारं सरकार आहे. या सरकारला दूरदृष्टी नाही. हाच रोष लोकांच्या मनात आहे, म्हणून आज लोक रस्त्यवर उतरले, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola