Sanjay Rathod | केवळ राजीनामा नको, संजय राठोडांना अटक करा; भाजपची मागणी

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अखेर संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पण केवळ त्यांच्या राजीनाम्यानं भागणार नाही तर राठोडांना अटक करा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

संजय राठोडांचा राजीनामा या आधीच घ्यायला हवा होता असं चंद्रकांत पाटील म्हणाले. संजय राठोड यांचा राजीनामा हा लोकांचा दबाव, भाजपचे आंदोलन आणि माध्यमांनी सातत्याने लावून धरलेला विषय यामुळे घेण्यात आल्याचं सांगत चंद्रकांत पाटील म्हणाले की, "राठोडांचा केवळ राजीनामा घेऊन भागणार नाही, तर त्यांना अटक करा आणि पूजा चव्हाणला न्याय द्या."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola