Maharashtra Rain Update : सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता
Continues below advertisement
राज्यात जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसानं बळीराजा सुखावला होता. पण ऑगस्ट महिन्यात पावसानं ओढ दिली आणि बळीराजासमोर चिंता उभी राहिली. गेल्या १५-२० दिवसांपासून पावसानं राज्यात विश्रांती घेतलीय. आणखी चिंतेची बाब म्हणजे तर उर्वरीत नऊ दिवसांमध्येही राज्यात पाऊस ओढ देणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. पण सप्टेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
Continues below advertisement