Sharad Pawar On Yuti : कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचं नाही, शरद पवारांच्या सूचना
Continues below advertisement
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात एक मोठे वक्तव्य केले आहे. 'कल्याण डोंबिवलीला विकासाचे ग्रहण लागले आहे आणि हे ग्रहण दूर करायचे असेल तर कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपाचा महापौर बसवावा लागेल,' असे स्पष्ट मत रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानामुळे निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये महापौरपदावरून रस्सीखेच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या केडीएमसी निवडणुकीसाठी (KDMC Elections) आता हालचालींना वेग आला आहे. चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संपूर्ण कल्याण-डोंबिवली परिसर भाजपमय करून पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement