Bird Flu in Maharashtra | परभणीच्या मुरुंब्यात कोंबड्यां नष्ट करण्यास सुरुवात
परभणीच्या मुरुंबा गावांमध्ये बर्ड फ्लूने दगावलेल्या कोंबड्यां नंतर उर्वरित राहिलेल्या तब्बल साडेसहा हजार कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुरुंबा गावात तब्बल 80 जणांचे 7 पथक दाखल झाले असुन कोंबड्यांना अनेस्थेसिया दिला जात आहे यानंतर त्यांचे पॅकिंग करून गावाच्या बाहेर करण्यात आलेल्या खड्यांमध्ये त्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे.