Bihar Exit Polls 2025: एक्झिट पोलमध्ये NDA ला स्पष्ट बहुमत, पुन्हा नितीश कुमार सरकारचे संकेत.
Continues below advertisement
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, आता सर्वांचे लक्ष १४ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे आहे. मतदान संपल्यानंतर समोर आलेल्या विविध एक्झिट पोलमध्ये NDA आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 'बिहारमध्ये पुन्हा एकदा NDA चे सरकार येणार असल्याचा अंदाज सर्वच पोलमधून व्यक्त करण्यात आलाय'. Matrize च्या सर्वेक्षणानुसार NDA ला १४७-१६७ जागा, तर INDIA आघाडीला ७०-९० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच, Chanakya Strategies ने NDA ला १३०-१३८ आणि INDIA आघाडीला १००-१०८ जागा मिळतील असे म्हटले आहे. Polstrat च्या अंदाजानुसार NDA १३३-१४८ जागांवर तर INDIA आघाडी ८७-१०२ जागांवर विजय मिळवू शकते. जवळपास सर्वच सर्वेक्षणांनी NDA च्या विजयाचे संकेत दिले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement