Bharat Bandh | भारत बंदला हिंसक वळण, सांगलीत रिक्षाच्या काचा फोडल्या | ABP Majha
धुळे जिल्ह्यातील शिरपूर-पानसेमल बसवर आंदोलकांनी दगडफेक केली आहे. त्यात दोन प्रवासी जखमी झालेत. बसवर दगफेक केल्यानंतर आंदोलकांनी बंद मागे घेतला.. तर तिकडे सांगलीतील मिरजमध्ये तरुणांनी रिक्षाच्या काचा फोडल्या आहेत. मिरजेतील कॅन्सर रुग्णालयासमोरील रस्त्यावर तरुणांनी जबरदस्तीनं रिक्षा वाहतूक बंद केली. तरी, पोलिसांनी रिक्षाची तोडफोड करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगला चोप देत दोघांना ताब्यात घेतलं आहे.