Bharat Bandh | सीएए,एनआरसीविरोधात आज भारत बंदची हाक | ABP Majha
सीएए, एनआरसी आणि ईव्हीएम विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आलीय.. याचा परिणाम आता मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झालेला दिसतोय. कांजूर मार्ग स्टेशनवर बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखल्यानं मध्य रेल्वेची वाहूतक १५ मिनिटं उशिरानं सुरु आहे. आंदोलकांना बाजूला करुन लोकलसेवा सुरु करण्यात आलीए. तरी, मध्य रेल्वेनं आंदोलकांना लोकल न थांबवण्याचं आवाहन केलंय. देशात डीएनएच्या आधारावर राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसी लागू व्हावा, अशी मागणी करण्यात येतेय.