Bacchu Kadu Majha Katta : मला पश्चाताप नाही, Guwahati दौऱ्यावर Bachchu Kadu ठाम, खोके आरोपांवर उत्तर
Continues below advertisement
आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरील आरोपांना आणि टीकेला उत्तर दिलं आहे. कडू यांनी त्यांच्यावर होणाऱ्या 'खोके' आरोपांना राजकीय अज्ञान ठरवत, आपण अशा आरोपांची पर्वा करत नसल्याचे स्पष्ट केले. 'मला पश्चाताप का होत नाही? मी अजूनही ताकदीनं गर्वाने सांगतोय,' असं म्हणत बच्चू कडूंनी आपली भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं, ती कोणती नैतिकता होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपण गुवाहाटीला गेलो कारण आपल्याला स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करायचं होतं आणि ते आपण मिळवलं, याचा आपल्याला अभिमान आहे, असंही ते म्हणाले. आपल्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत आणि आपण १ १५ वेळा रक्तदान केलं आहे, याकडे विरोधक सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात, असंही कडू यांनी नमूद केलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement