Bacchu Kadu Rail Roko : वेळ पडल्यास रक्त सांडायलाही तयार, बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा
Continues below advertisement
नागपूरमध्ये (Nagpur) प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी विविध २२ मागण्यांसाठी मोठे आंदोलन सुरू केले आहे. 'जर वेळ पडली रक्त वाहण्याचं तर तेही आम्ही वाहिल्याशिवाय राहणार नाही,' असा थेट इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. या आंदोलनामध्ये शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांचे प्रश्न, मेंढपाळ, मच्छीमार आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा समावेश आहे. चर्चेसाठी मुंबईला (Mumbai) येण्याचे सरकारचे निमंत्रण आंदोलकांनी नाकारले असून, सरकारने नागपूरमध्येच (Nagpur) येऊन चर्चा करावी या मागणीवर ते ठाम आहेत. जोपर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका बच्चू कडू आणि राजू शेट्टी (Raju Shetti), महादेव जानकर (Mahadev Jankar) यांसारख्या नेत्यांनी घेतली आहे. सरकारने मागण्या मान्य करण्यासाठी जीआर (GR) काढावा, पैशांची तरतूद नंतर केली तरी चालेल, असा पर्यायही कडू यांनी सुचवला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement