Bachchu Kadu Protest: 'कर्जमुक्ती नाही, तर Nagpur सोडणार नाही', बच्चू कडूंचा सरकारला इशारा
Continues below advertisement
माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव या प्रमुख मागण्यांसाठी नागपुरात 'महाएल्गार' आंदोलनाची हाक दिली आहे. अमरावतीतून हजारो शेतकऱ्यांसह निघालेला हा ट्रॅक्टर मोर्चा २८ ऑक्टोबरला नागपुरात धडकणार असून, आजचा मुक्काम वर्ध्यात आहे. बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे की, 'जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, हमीभाव नाही, माझ्या दिव्यांगांचे, मेंढपाळांचे, मच्छीमारांचे प्रश्न सुटले नाहीत, तर आम्ही वापस जाणार नाही'. सरकारने चर्चेचे निमंत्रण दिले असले तरी, यापूर्वीची बैठक निष्फळ ठरल्याचे कडू म्हणाले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत नागपूर सोडणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement