Bacchu Kadu Protest: महाएल्गार आंदोलन थांबणार की चिघळणार? जनजीवन विस्कळीत

Continues below advertisement
नागपूरमध्ये (Nagpur) शेतकरी कर्जमाफीसाठी (Farm Loan Waiver) बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या 'चक्काजाम' आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) मध्यस्थी करण्याची शक्यता वर्तवली जात असताना, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बच्चू कडूंना 'अर्बन नक्षल' (Urban Naxal) ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला पाहिजे, नाहीतर आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही,' असा स्पष्ट इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. आंदोलनाचा तिसरा दिवस असून, नागपूर-वर्धा, जबलपूर आणि हैदराबादसह चार प्रमुख महामार्ग शेतकऱ्यांनी अडवले आहेत. आऊटर रिंग रोडवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागपूरकरांचे प्रचंड हाल होत आहेत. जवळपास १७ तासांपासून महामार्ग ठप्प असल्याने शहराची वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola