Bachchu Kadu PC : ‘निर्णय घ्या, नाहीतर रामगिरीवर धडकणार’, बच्चू कडूंचा इशारा
Continues below advertisement
नागपुरात (Nagpur) आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu), अजित नवले (Ajit Navale) आणि राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers' Protest) तीव्र झाले आहे. शक्तीपीठ महामार्ग (Shaktipeeth Expressway) रद्द करणे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर (Farm Loan Waiver) तात्काळ निर्णय घेण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. 'चार-पाच वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतोय, त्यानंतर मात्र आम्हाला मुख्यमंत्री रामगिरी बंगल्यावर जावं लागेल,' असा थेट इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव (Divyang protesters) सामील झाले असून, पोलिसांनी बळाचा वापर करताना काळजी घ्यावी, कारण त्यांच्यापर्यंत सूचना पोहोचणार नाहीत, असे आवाहन कडू यांनी केले आहे. जोपर्यंत शासन लेखी निर्णय देत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement