Bachchu Kadu Chakka Jam | राज्यभरात 'चक्का जाम', शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन

बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभर 'चक्का जाम' आंदोलन सुरू आहे. शेतकरी, दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छिमार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तारीख निश्चित करावी, शेतमजुरांना अपघात विमा लागू करावा, मेंढपाळ आणि मच्छिमारांचे प्रश्न सोडवावे, तसेच अपंगांचे किमान आठ प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. कर्जमाफीच्या बाबतीत समिती गठीत केली असली तरी, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सातबारा कोरा करण्याची मागणी कायम आहे. कर्जमाफीला बगल देणे योग्य नाही, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तरी, आंदोलन शांततेत सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे आंदोलन सर्वपक्षीय असून, बच्चू कडू स्वतः अचलपूर, चांदणी बाजार अमरावती, संभाजीनगर, लातूर आणि नांदेड येथे आंदोलनात सहभागी होणार आहेत. "जोपर्यंत कर्जमाफीची घोषणा होणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील," असे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola