Farmers' Protest: 'मुख्यमंत्र्यांना काळजी असेल तर प्रतिनिधी पाठवा', Bacchu Kadu बैठकीला जाणार नाहीत
Continues below advertisement
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी पुकारलेला 'महाएल्गार मोर्चा' (Mahayalgarr Morcha) अमरावतीहून नागपूरमध्ये धडकणार आहे, ज्यामुळे सरकारवर दबाव वाढला आहे. 'मुख्यमंत्र्यांना जर शेतकऱ्यांची काळजी असेल तर त्यांनी चर्चा करुन प्रतिनिधी पाठवावेत,' अशी स्पष्ट भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज सकाळी साडेदहा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीला उपस्थित राहण्यास कडू यांनी नकार दिला आहे. याआधी झालेल्या बैठकांमधून काहीही निष्पन्न झाले नाही, असे कारण त्यांनी दिले आहे. सरकारने मागण्यांवर थेट निर्णय घेऊन तो कळवण्यासाठी प्रतिनिधी पाठवावा, अशी मागणी कडू यांनी केली आहे, त्यामुळे आता सरकार काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement