Farmers Protest: 'मुख्यमंत्र्यांनी प्रतिनिधी पाठवावा', Bacchu Kadu बैठकीला जाणार नाहीत

Continues below advertisement
शेतकरी कर्जमाफीच्या (Farm Loan Waiver) मागणीसाठी आक्रमक झालेले बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा 'महाएल्गार मोर्चा' (Maha Elgar Morcha) आज अमरावतीहून नागपूरमध्ये (Nagpur) दाखल होणार आहे. 'मुख्यमंत्र्यांना जर शेतकऱ्यांची काळजी असेल तर त्यांनी चर्चा करून प्रतिनिधी पाठवावे,' अशी स्पष्ट भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. सरकारने चर्चेसाठी सकाळी साडे दहा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावली असली तरी, आधीच्या बैठकांमधून काहीही निष्पन्न न झाल्याने कडू या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. हा विचारांचा लढा असून, जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनाला काँग्रेसने (Congress) पाठिंबा दर्शवला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola