Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

Continues below advertisement
आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी त्यांच्यावरील टीकेला उत्तर देताना आपल्या राजकीय आणि आंदोलनाच्या भूमिकेवर सविस्तर भाष्य केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनांमुळे दाखल झालेल्या ३५० गुन्ह्यांचा उल्लेख केला. 'तिथे सीतेलाच परीक्षा द्याव्या लागल्या तर आमचा काय खेळ आहे?', असा सवाल करत बच्चू कडू यांनी आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले. सत्तेतून बाहेर पडल्यामुळे आंदोलनाचा मार्ग धरल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि 'आसूद यात्रे'ची आठवण करून दिली. माझ्या आईनेच मला हजार गुन्हे दाखल झाले तरी न थांबण्याचा सल्ला दिला होता, असे त्यांनी सांगितले. काही लोक अज्ञानामुळे तर काही राजकीय पोटदुखीमुळे आरोप करतात, असेही ते म्हणाले. स्वतःमध्ये बदल करण्याऐवजी बच्चू कडूला बदनाम करणे सोपे आहे, अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola